
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात व तालुक्यात रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये नागरिकांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रविवारी (ता. 4) दिवसभरात 500 रुपये प्रमाणे 36 जणांवर तर आज 200 रुपयांप्रमाणे 50 जणांवर कारवाई करत 2 दिवसात 40 हजारांचा दंड आकारला गेला. आज खुद्द पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी कारवाईच्या ठिकाणी भेट देत माहितीचा आढावा घेतला. कारवाई करण्याचा सूचना दिल्या.
देशभरामध्ये कोरोनाची लाट पुन्हा एकदा आली आहे. राज्यातील कोरोणाचे रुग्ण वाढत आहेत. तालुक्याच्या ठिकाणीही गेले काही दिवस कोरोना संख्येचा वाढता आलेख दिसून येत आहे. राज्य सरकारने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. त्याची जिल्हा प्रशासनाकडून तालुकावार राबविण्यात येत आहे. मोठी शहरे आणि मोक्याची ग्रामीण भागातील ठिकाणे याठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस यंत्रणेकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
देशांमध्ये विविध प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिवसा जमावबंदी रात्री संचार बंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या आदेशानुसार शहरभरात मोक्याच्या ठिकाणी पोलिसांची तैनाती करण्यात आली असून मास्क लावणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. काल पोलीस प्रशासनाकडून 500 रुपये प्रति व्यक्ती अशी दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये तब्बल 36 नागरिकांवर कारवाई करत 500 रुपये प्रमाणे 18 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. आज सकाळपासूनही पुन्हा एकदा धडक कारवाई करण्यात आली.
येथील चिटणीस नाका परिसरात पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील, हेडकॉन्स्टेबल दिलीप धुरी, श्री. पारधी, वाहतूक पोलीस हवालदार प्रवीण साबळे, सुनील नाईक यांनी धडक कारवाई करत दिवसभरात जवळपास 50 दंड आकारला. ही कारवाई प्रतिव्यक्ती 200 रुपये प्रमाणे करण्यात आली. शहरात विविध ठिकाणी कारवाई सुरू असताना येथील पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी कारवाई होत असलेल्या ठिकाणी जात तेथील पोलिसांना सूचना दिल्या. मास्क वापरणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची गय न करता थेट दंड आकारावा, असे सूचित केले.
येथील पालिकेसमोरील भागातही पोलीस प्रशासनाकडून विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. सायंकाळच्या सुमारास सर्वात जास्त कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली. काल वाहतूक पोलीस सखाराम भोई, पोलीस कर्मचारी मनोज राऊत, उमेश राणे, जयराम लोके आदी या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या या कारवाईमुळे शहरात दुचाकीवरून फिरत असलेले विनामास्क वापरणाऱ्या तरुणांना चाप बसला आहे. शहरात पोलिस प्रशासन कारवाईसाठी पुढे आले आहे; मात्र यात पालिका प्रशासनाची कोणती भूमिका दिसत नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.