रत्नागिरी : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदी अंतर्गत पोलिसांनी दोन दिवसात वाहनधारकांवर मोठी कारवाई केली. 60 तपासणी नाक्यावर 1 हजार 300 वाहनांमधील 2 हजार 550 जणांची तपासणी केली. तपासणीत मोटार परिवहन कायद्याअंतर्गत 569 वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून 1 लाख 51 हजार 300 रुपये दंड वसूल केला. गेल्या दोन दिवसातील पोलिस दलाची ही कारवाई आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन आणि जिल्हा पोलिस यंत्रणा प्रभावी काम करीत आहेत. जिल्ह्यात सरसकट चाचण्यांसह जिल्ह्याबाहेरून येणार्या लोकांची तपासणी होत आहे. त्यांनाही चाचणी बंधनकारक केली आहे. चाचण्या वाढल्याने जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने आता साडे पाचशेचा आकडा ओलांडला आहे. बाधितांची ही संख्या एप्रिलच्या अखेरपर्यंत अशी वाढत राहणार असल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
जिल्हा पोलिस दलाने सतरा आणि अठरा तारखेला जिल्ह्यातील 60 नाकाबंदी ठिकाणे उभारली आहेत. त्यावर एकूण 1 हजार 300 वाहनांची तपासणी केली. त्यामधील 2 हजार 550 व्यक्तींची तपासणी झाली. या तपसाणीमध्ये मोटार परिवहन कायद्याअंतर्गत 569 वाहनांवर केसेस केल्या. त्यांच्याकडून 1 लाख 51 हजार 300 रुपये दंड वसूल केला आहे. जिल्हा पोलिस दलाची ही कारवाई अशीच पुढे सुरू राहणार आहे.
Edited By- Archana Banage
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.