दुबईहून (Dubai) मालदीवला जाणारे जहाज ३ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडले. भरकटलेले बसरा स्टार जहाज (Basra Star Ship) गेले पाच वर्षे मिऱ्या किनारी अडकून पडलेले आहे.
रत्नागिरी : येथील मिऱ्या किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळामुळे अडकून पडलेले बसरा स्टार जहाज पाहण्यासाठी परजिल्ह्यातील पर्यटक येत आहेत. त्यांच्यासाठी स्थानिकांनी हॉटेल सुरू केले असून, या माध्यमातून पर्यटन (Tourism) व्यवसायालाही चालना मिळाली आहे. येत्या काही दिवसांत पर्यटन स्पॉट बनलेले जहाज बाजूला काढण्यात येणार आहे.