जन्मभूमीच्या लेकरांना लोंढे म्हणाल तर खबरदार ; डॉ. विनय नातू

BJP district president Dr. Vinay Natu told the Collector
BJP district president Dr. Vinay Natu told the Collector

गुहागर (रत्नागिरी) : जन्मभूमीच्या लेकरांना लोंढे म्हणाल तर खबरदार, येणारे लोंढे म्हणायला ते परप्रांतीय आहेत का अशा शब्दात माजी आमदार व उत्तर रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष  डॉ. विनय नातू यांनी जिल्हाधिकारी यांना सुनावले आहे. सरकारने परवानगी दिल्यानंतरच नियम पाळून ग्रामस्थ जिल्ह्यात येत आहेत. अशावेळी परिस्थिती हाताबाहेर गेली असे सांगून अपयश लपविण्यासाठी, आपल्यावरील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत असल्याचा आरोप डॉ. विनय नातू यांनी केला आहे.

कोकणात येणार्‍या जनतेला लोंढे म्हणत जिल्हाधिकार्‍यांनी आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे वक्तव्य  केले. त्यामुळे चिडलेल्या डॉ. नातूंनी जिल्हाधिकार्‍यांना सुनावले आहे. 23 मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर आजपर्यंत मिळालेल्या कालावधीत अनेक गोष्टी जिल्हाधिकार्‍यांना करता आल्या असत्या. मात्र परिस्थिती डोळ्यासमोर दिसत असतानाही सरकारी यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष का केले. आपल्या बेजबाबदार कारभाराचे खापर जनतेवर फोडायचे काम करु नका. कोरोना बाबतीत मोठमोठ्या घोषणा करण्याच्या आधी जिल्ह्यातील यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यात का आले नाही.

जिल्हा प्रशासन जबाबदारी झटकतेय​

आता कुठे इतरत्र असणारे जिल्हावासीय सरकारने परवानगी दिल्यानंतर शासन नियम पाळून जिल्ह्यात येऊ लागले तर लगेच परिस्थिती हाताबाहेर कशी गेली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून इतर राज्यांनी जबाबदारीने आपल्या नागरिकांना मोफत आपापल्या राज्यात नेले आणि इथे राज्यांतर्गत प्रवासालाही तिप्पट भाडे आकारणी करण्यात येत आहे. हा जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com