मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडला. दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली, आमदार निधी दोन कोटी वरुन तीन कोटी करण्यात आला आहे. तसेच विविध योजनासाठी निधींची घोषणा यावेळी करण्यात आली.
कोकणासाठी काय ?
काल अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्याची घोषणा
कोकणचं वैभव राखण्यासाठी सरकार कटिबद्ध असून जलदुर्गांचा विकास करुन पर्यटन वाढवू. तसेच येत्या एप्रिलमध्ये कोकणात व्हायरोलॉजी लॅब सुरू करणार आणि चांगली दवाखाने सुरू करणार असल्याची घोषणा काल मुख्यमंत्र्यांनी केली होती. तसेच एक मेपर्यंत चिपी विमानतळ सुरू करणार असून अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत अशी घोषणा त्यांनी केलती.
या सर्व घोषणांवर मात्र विरोधी पक्षाने नाराजी व्यक्त करत या अर्थसंकल्पात सरकारने कोकणाच्या तोंडाला फक्त पानं पुसण्याच काम केलं अशी टिका केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.