चिपळूण : आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन गावातच शक्य

आमदार भास्कर जाधव यांची गृहनिर्माण प्रकल्प योजना; सरकारच्या प्रतिसादाची प्रतीक्षा
आमदार भास्कर जाधव यांची गृहनिर्माण प्रकल्प योजना; सरकारच्या प्रतिसादाची प्रतीक्षा
आमदार भास्कर जाधव यांची गृहनिर्माण प्रकल्प योजना; सरकारच्या प्रतिसादाची प्रतीक्षाsakal

चिपळूण : ज्या गावातील लोकांचे सरकारला पुनर्वसन करायचे आहे, ते गावाबाहेर न करता गावातच सुरक्षित ठिकाण शोधून लोकांचे पुनर्वसन करावे. त्यासाठी एकच गृहनिर्माण प्रकल्प बांधावा. हजार ते बाराशे स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचे घर प्रत्येकाला द्यावे. एका गावातील ४० लोकांचे पुनर्वसन करायचे असेल तर सरकारने ५० लोकांसाठीचा गृहनिर्माण प्रकल्प तयार करावा, म्हणजे भविष्यात त्याच गावातील अन्य कोणाचे पुनर्वसन करायचे असल्यास त्यांना तेथे करता येईल, अशी योजना आमदार भास्कर जाधव यांनी मांडली.

आपद्ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मी राज्य सरकारला योजना दिली आहे. सरकार त्यावर विचारविनिमय करीत आहे, असा दावा शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला. मात्र, सरकारतर्फे यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही. सरकारने माझे म्हणणे विचारात घेतले तर राज्यपातळीवर पुनर्वसनाचा प्रश्न सहज आणि सोप्या पद्धतीने सुटू शकतो, असा विश्वास जाधव यांनी योजनेबद्दल व्यक्त केला.

आमदार भास्कर जाधव यांची गृहनिर्माण प्रकल्प योजना; सरकारच्या प्रतिसादाची प्रतीक्षा
हडपसरच्या एस. एम. जोशी कॉलेजमध्ये झाले आंतरराष्ट्रीय वेबिनार

श्री. जाधव म्हणाले, की राज्यात कोणत्याही गावात आपत्ती आली तर परिस्थिती पाहून तेथील लोकांचे तात्पुरते स्थलांतर केले जाते; तर कधी कायमस्वरूपी पुनर्वसन केले जाते. सरकार आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन करताना त्यांना पर्यायी जागा आणि सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास तयार असताना केवळ गाव सोडायचे नाही, गावातील जमीन व इतर मालमत्ता वाऱ्यावर सोडून जाता येत नाही, म्हणून आपत्तीग्रस्त पुनर्वसनासाठी तयार होत नाहीत.

शेती, बागायती करता येईल

आपद्ग्रस्तांचे गावातच सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन झाले तर त्यांना गावात असलेली शेती, बागायती करता येईल. आपल्या मालमत्तेची निगा राखता येईल आणि सरकारला आपद्ग्रस्तांचे जीवही वाचविता येतील. ग्रामीण भागातील गावांमध्ये तसेच शहरातील एखाद्या मर्यादित भागात ही योजना अमलात आणणे शक्य असल्याचा पर्याय मी सरकारला दिल्याचे जाधव यांनी सांगितले.

५० लोकांसाठीचा गृहनिर्माण प्रकल्प व्हावा

ज्या गावातील लोकांचे सरकारला पुनर्वसन करायचे आहे, ते गावाबाहेर न करता गावातच सुरक्षित ठिकाण शोधून करावे. त्यासाठी एकच गृहनिर्माण प्रकल्प बांधावा. हजार ते बाराशे स्क्वेअर फूट क्षेत्रफळाची खोली प्रत्येकाला द्यावी. एका गावातील ४० लोकांचे पुनर्वसन करायचे असेल तर सरकारने ५० लोकांसाठीचा गृहनिर्माण प्रकल्प तयार करावा, असेही श्री. जाधव यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com