गटारातील सांडपाण्यामुळे विहिरींचे पाणी दूषित

गटारातील सांडपाण्यामुळे विहिरींचे पाणी दूषित

- rat११p१३.jpg-
P24M89356
गणपतीपुळे ः गटारातील सांडपाणी साचल्यामुळे पसरलेली दुर्गंधी.

गटारातील सांडपाण्यामुळे विहिरी दूषित

गणपतीपुळेतील प्रकार; ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे कोल्हटकर तिठ्याजवळील विहिरींचे पाणी दूषित झाल्यामुळे संबंधित व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गणपतीपुळे येथील आपटातिठा ते कोल्हटकर तिठा या मुख्य मार्गालगत गटाराचे काम मागील काही महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. या गटारामध्ये गणपतीपुळे येथील परिसरातील काही हॉटेल व्यावसायिकांनी सांडपाण्याची पाईपलाईन जोडल्या आहेत. तेथील पाईप निसटल्यामुळे सांडपाणी जवळच्या विहिरींमध्ये जात आहे तसेच काही ठिकाणी सांडपाणी साचून राहिल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. सांडपाण्याच्या दुर्गंधीचा पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे. काही लोकांच्या विहिरींचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. त्या ठिकाणी असलेल्या विहिरींचे पाणी स्थानिक हॉटेल व्यावसायिक आपल्या स्वतःच्या कुटुंबांसाठी आणि पर्यटकांसाठी करतात; मात्र सध्या पाणी दूषित झाल्यामुळे संबंधित व्यावसायिकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक व्यावसायिकांनी स्थानिक गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार केलेला आहे. अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही. ग्रामपंचायतीने याबाबत योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com