
ओरोस, (जि.सिंधुदुर्ग) : शालेय शिक्षणमंत्री पद मिळाल्याने मी नाराज नाही. शिक्षण धोरण वारंवार बदलून चालणार नाही. त्यामुळे अभ्यासपूर्ण निर्णय घेतले जातील, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शालेय शिक्षणमंत्री पद मिळाल्याने मी नाराज असल्याबाबत बोलले जात आहे; पण मी नाराज नाही. खातेपाटप झाल्यानंतर उद्योग, पर्यटनसारख्या खात्यात विकास करण्याची ताकद आहे. शिक्षण खात्यात नाही, असे बोललो होतो. त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला; पण मी नाराज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘‘मी अजून पदभार स्वीकारलेला नाही. हा विभाग महत्त्वाचा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर पगारासाठी होत असलेल्या खर्चाच्या ५० टक्के खर्च शिक्षकांवर होत असतो. त्यामुळे निर्णय घेताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. शिक्षण व्यवस्थेत अचानक मोठे बदल करता येणार नाही. तसे केल्यास त्याचा दुष्परिणाम शिक्षण क्षेत्रावर होऊ शकतो. बदल करायचा झालाच, तर जुना निर्णय घेताना नेमका कोणता उद्देश होता, याचा अभ्यास करून गरज असलेला बदल केला पाहिजे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.