साडवली (रत्नागिरी) : शेताच्या बांधावर खतं देवु अशी फसवी घोषणा करणाऱ्या राज्य सरकारने बांधावर नको पण विक्री केंद्रात तरी खतं उपलब्ध करून द्यावीत अशी खोचक मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी केली आहे.
केंद्र सरकारने मे महिन्यातच RCF च्या माध्यमातून खतं पोचवली असताना केवळ कोरोनाचे कारण सांगून सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. याबाबतीत तालुका कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनीही असमर्थता दर्शवत आठ दिवसांत खतं उपलब्ध होइल असे सांगितले. बांधावर सोडा पण रोखीने शेतकऱ्यांना केंद्रावर तरी खत द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
येत्या ८ दिवसांत तालुक्यात खत पुरवठा सुरळीत झाला नाही तर भाजप तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.