घोलवडमधील पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरल्याने पाण्यासाठी वणवण

water.jpg
water.jpg

 डहाणु : डहाणु तालुक्यातील घोलवड ग्रामपंचायत क्षेत्रातील टोकेपाडा भागतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची पाळी आली आहे. अवघ्या दोनशे मिटर अंतरावर पाण्याची टाकी असुनही पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारच्या जलस्वराज योजनेतून 2009 साली सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून राबविण्यात आलेली जलस्वराज पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. घोलवड पासुन दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अस्वाली धरणातून या गावाला पाणी पुरवठा केला जातो आहे. मात्र धरण परिसरात वीज पुरवठा अनियमीत असल्याने जलकुंभ भरले जात नसल्याने गावाला नियमीत पाणी पुरवठा करणे शक्य होत नसल्याचे ग्रामपंचाती कडून सांगितले जाते.

घोलवड गाव समुद्र किनाऱ्यावर असल्याने परिसरातील विहरीचे पाणी खारट झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अनेक वर्षे वणवण करावी लागत असे. 2009 साली पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यावर पाण्याचे दुर्भिक्ष कमी होईल आशी अपेक्षा केली जात होती. मात्र पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य अलका शशिकांत नारगोळकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com