Sindhudurg Elephant Threat : हत्तींना हटवा; अन्यथा ‘वन’समोर ठाण; कोलझर पंचक्रोशीतून इशारा; काजू उत्पन्नच सडले तर जगायचे कसे?

Cashew Harvest : सावंतवाडी तालुक्यातील कोलझर परिसरात हत्तींच्या कळपाने तळ ठोकल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन अक्षरशः संकटात सापडले आहे. काजू हंगामाच्या महत्त्वाच्या काळात बागेत जाणेही धोकादायक ठरत असून झाडाखाली पडलेले काजू सडून जात आहेत.
Cashew farmers in Sawantwadi

Cashew farmers in Sawantwadi

sakal

Updated on

सावंतवाडी : काजू उत्पन्नावर आमच्या परिसरातील शेकडो कुटुंबांचे वर्षभराचे अर्थकारण चालते. आता काजू गोळा करण्याच्या हंगामातच बागामध्ये हत्तींनी ठाण मांडल्यामुळे उत्पन्न झाडाखाली सडून जात आहे, मग आम्ही पुढचे वर्षभर कुटुंब चालवायचे कसे?, असा संतप्त सवाल करत आमच्या पंचक्रोशीतून चार दिवसांत हत्तीना हटवा, अन्यथा आम्ही वन विभागासमोर ठाण मांडू, असा निर्वाणीचा इशारा कोलझर-तळकट दशक्रोशीतील शेतकऱ्यांनी येथील वन विभागाला दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com