मोठी बातमी - रत्नागिरी पालिकेच्या कर्मचार्‍यांना मिळणार विमा कवच

Employees of Ratnagiri Municipality will get insurance cover
Employees of Ratnagiri Municipality will get insurance cover

रत्नागिरी - कोरोना विषाणूशी लढणार्‍या रत्नागिरी पालिकेच्या 39 अधिकारी, कर्मचार्‍यांना 25 लाखाच्या विम्याचे कवच मिळाले आहे. नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. कर्मचार्‍यांचा विमा उतरविणारी रत्नागिरी पालिका राज्यातील पहिली पालिका असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

देशात आणि राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोरोनाशी लढणार्‍या आरोग्य, पोलिस, नर्स, आशा वर्कर्स हे कोरोना योद्धा म्हणून लढत आहेत. त्यांच्याबरोबर पालिकेचे अधिकारी, कर्मचारीही कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कर्तव्यावर आहेत. त्यांना या विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. पालिकेने एलआयसी या शासनमान्य कंपनीचा जीवण अमर टर्म इन्शुरन्स विमा उतरविला आहे. पालिकेतील 39 अधिकारी, कर्मचार्‍यांना या विम्याचे कवच मिळाले आहे. विम्याची रक्कम 25 लाख प्रती कर्मचारी आहे.

कोरोना प्रादुर्भाव असेपर्यंत पालिकेमार्फत हे संरक्षण राहणार आहे. त्यासाठी पालिकेमार्फत प्रत्येक वर्षी 7 हजार 760 हप्ता भरण्यात येणारा आहे. याचा एकूण खर्च 2 लाख 99 हजार 130 रुपये एवढा आहे. कोरोना विषाणूबाबतचे कर्तव्य बजावताना कोरोना विषाणूचा संसर्ग  होऊन मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचार्‍यांना रक्कम 25 लाखाचे विमा कवच पुरविले जाणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com