बामणोली धरण भरल्याने शेतकऱ्यांना दिलासा

farmers are happy because bamnoli dam is full
farmers are happy because bamnoli dam is full

रसायनी (रायगड) : जांभिवली येथील बामणोली धरण नुकतच भरून सांडव्यातुन पाणी वाहु लागले आहे. यंदाच्या वर्षी धरण लवकर भरून वाहु लागल्याने जांभिवली पंचक्रोशितील शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. 

जांभिवली गावाच्या हद्दीत घेरा मणिकगडाच्या पायथ्या़शी हे धरण 35 वर्षा पुर्वी बांधले आहे. धरणाच्या पाण्याचा जांभिवली, सवने, चावणे आदी गावातील शेतकऱ्यांना मोठा आधार झाला आहे. खरीप हंगामातील भात पिकानंतर शेतकरी रब्बी हंगामात भात पिका बरोबर भाजी पाल्याचे पिक घेऊ लागले आहे. सिचंनाचे खात्रीचे साधन मिळाल्याने जांभिवली परीसरात हरीतक्रांती झाली आहे. बारामहिने जनावरांना हिरवा चारा मिळु लागल्याने काही शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणुन दुग्ध व्यावसाय सुरू केला आहे. दरम्यान या वर्षी धरण लवकर भरून सांडव्यातुन पाणी वाहु लागले आहे. त्यामुळे पंचक्रोशितील शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. तर धरणात पाणी साठ्याची क्षमता 2.48 द.ल.घ.मी असल्याचे सांगण्यात आले. 

यापुर्वी मागील दोन वर्षात धरण 2016 ऑगस्ट मधील पहिल्या आठवड्यात आणि 2017 जुलै मधील तिसऱ्या आठवड्यात भरले होते. असे जानकार शेतकऱ्यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com