कोकणात विशेष रेल्वे का आली रिकामी ?

few people responded to special central trains run on konkan rail line
few people responded to special central trains run on konkan rail line

रत्नागिरी : उलटलेला दहा दिवसाचा क्वारंटाईन कालावधी आणि कोकणात येण्यापूर्वी 48 तास आधी कोरोना तपासणीचा निगेटिव्ह अहवाल यामुळे कोकणात गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेल्या विशेष ट्रेनला अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. जवळपास 187 फेऱ्या ट्रेनच्या सोडण्यात येणार आहेत. शनिवारी रात्री लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरीसाठी सुटलेली पहिली गणपती स्पेशल ट्रेन आज पहाटे रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाली. वेळेआधीच जवळपास अर्धा ते पाऊण तास अगोदर ही ट्रेन रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाली. मात्र अवघे 11 चाकरमानी या ट्रेनने रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरले. त्यामुळे अतिशय अल्प प्रतिसाद या ट्रेनला मिळाल्याचं पहायला मिळालं.  

दुसऱ्या ट्रेननेही अवघे 16 प्रवासी रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरले. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर आलेली दुसरी ट्रेन म्हणजेच सीएसएमटी - सावंतवाडी ही ट्रेन सावंतवाडीकडे रवाना झाली. मात्र सावंतवाडीकडे रवाना होताना सुद्दा रेल्वेचे अनेक डब्बे रिकामे पहायला मिळाले. 

दरम्यान, विलगीकीकरणात राहण्यासाठीचा दहा दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे. जे चाकरमानी 12 ला आले त्यांना गणपतीच्या पहिल्या दिवसाच्या उत्सवात सहभागी होता येणार आहे. त्यांनतर आलेल्या लोकांना विलगीकीकरण कालावधी संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे चाकरमानी कोकणकडे येण्यास अनुत्सुक होते. याच कालावधीत कोकण रेल्वे मार्गांवर गाड्या सोडण्यात आल्याने त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

संपादन - स्नेहल कदम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com