Fishermen face uncertain times as north winds disrupt fishing activity, with hopes of a better catch after Ram Navami."Sakal
कोकण
Fishing break : उत्तरेकडील वाऱ्यामुळे मासेमारीला ‘ब्रेक’: मच्छीमार हवालदिल; मासळीही गायब, रामनवमीनंतर मासळीची आशा
जोरदार वाऱ्यामुळे शिमगोत्सवानंतर मासेमारीला गेलेल्या नौका तिथेच समुद्रात नांगर टाकून थांबल्या आहेत, तर ७० टक्के नौका आंजर्ले खाडीतच नांगर टाकून आहेत. यावर्षी सुरुवातीपासूनचा हंगाम खूपच खराब गेला आहे.
दापोली : उत्तरेकडील जोरदार वाऱ्यामुळे हर्णै बंदरातील मासेमारीला ब्रेक लागला आहे. गेले आठ दिवस वाऱ्यामुळे मासेमारीला गेलेल्या मच्छीमारांना मासळीही मिळालेली नाही. ऐन हंगामात जोरदार वारे आणि मासळी मिळत नसल्याने मोठा फटका व्यावसायिकांनाही बसला आहे. येथील बंदरावर भरणाऱ्या बाजारातही शुकशुकाट आहे. रामनवमीनंतर (६ एप्रिल) मासळी मिळेल, अशी आशा मच्छीमारांना वाटत आहे.

