

Poor mobile connectivity and the lack of basic facilities have worsened the situation for stranded passengers.
Sakal
पाली : मुसळधार पावसामुळे रायगड (कोकण) आणि मुंबई व पुणे या शहरांना जोडणाऱ्या प्रमुख महामार्गांवर सोमवारी (ता. 6) देखील पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, तासन्तास झालेल्या खोळंब्यामुळे व वॉशरूम अभावी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच अनेक भागांतील मोबाईल नेटवर्क संथ आणि ठप्प झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे.