Ratnagiri Dam Mishap : तिवरे धरण फुटले अन् होत्याचे नव्हते झाले

ratnagiri
ratnagiri

चिपळूण : तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली गेली आहेत. या घटनेने परिसरात हाहाकार माजला असून किमान 19 ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास प्रथम तिवरे-खडपोली धरण भरून वाहू लागलं. त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक तलाठ्यांनी गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला. त्यानंतर तासाभरातच धरण फुटून धरणाखाली येणाऱ्या गावांमध्ये पाणी घुसले आणि हाहाकार उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये पाणी घुसले आहे. यात किमान १९ ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. स्थानिकांशी संपर्क साधला असता त्यांनी किमान २३ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली आहे. पाण्याचा प्रचंड वेग असल्याने काही घरेही वाहून गेल्याची भीती आहे. ज्या गावांमध्ये धरणाचे पाणी शिरले आहे त्या गावांत सुमारे ३ हजार इतकी लोकवस्ती आहे.

एनडीआरएफला पाचारण
रत्नागिरी जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाला रात्री साडेदहाच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. जिल्हाधिकारीही घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. पुणे तसेच सिंधुदुर्गातून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आल्याची माहितीही जिल्हा प्रशासनाने दिली. ही दुर्घटना अलोरे-शिरगावच्या पोलिस चौकीच्या हद्दीत घडली असून स्थानिक पोलीस सुरुवातीपासूनच युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com