रत्नागिरी : शहरात होणारी हेल्मेट सक्ती दुचाकी वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहे. वाहतूक पोलिसांकडून कोणतेही सौजन्य दाखविले जात नाही. लोकप्रतिनिधींनाही जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते. नागरिकांमध्ये या सक्तीमुळे असंतोष आहे.
वाहतूक निरीक्षक किंवा पोलिस अधीक्षकांना भेटून ही सक्ती मागे घ्यावी, अशी विनंती करू, अन्यथा पालिकेच्या गाळ्यामध्ये नाममात्र भाडेतत्त्वावर असलेला वाहतूक पोलिसांच्या कार्यालयाचा करार रद्द करू, असा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज भाजपचे नगरसेवक राजू तोडणकर यांनी हा विषय उचलून धरला.
दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्न असला तरी शहरात नको, शहराबाहेर हेल्मेट सक्ती करावी, अशी विनंती करूया अन्यथा पालिकेच्या गाळ्यांमध्ये नाममात्र भाडेतत्त्वावर असलेल्या वाहतूक पोलिस कार्यालयाचा करार रद्द करू, असे मत मांडले. याला सर्व सदस्यांनी पाठिंबा देत तसा ठराव केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी हेल्मेट सक्ती रद्दची मागणी केली होती.
नागरिक म्हणतात
"शहरातील हेल्मेट सक्ती रद्द करण्याचा ठराव घेऊन वाहतूक पोलिस किंवा पोलिस अधीक्षकांना भेटून तशी विनंती करू. पोलिस अरेरावी करतात हे सांगू. लोकप्रतिनिधींना अशी वागणूक देणे योग्य नाही."
- राजू तोडणकर, नगरसेवक
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.