Uatkarsh Mapara
sakal
पाली - मध्यपूर्व आशियाई देशांमध्ये उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे रायगड जिल्ह्यातील अनेक नागरिक तेथे अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रायगड जिल्हा नियंत्रण कक्षाला प्राप्त झालेल्या ताज्या अहवालानुसार, सौदी अरेबिया, कुवेत, कतर आणि दुबई यांसारख्या आखाती देशांमध्ये जिल्ह्यातील सुमारे 20 नागरिक असून, त्यापैकी बहुतांश नागरिक मायदेशी परतण्यासाठी इच्छुक आहेत.