
राजापूर : धार्मिक कार्य, लग्नसमारंभ असो वा देवदर्शन यासाठी मोठ्या प्रमाणात नारळाची मागणी असते. त्याचवेळी रूचकर जेवणासाठी नारळ महत्वपूर्ण असल्याने घरगुती वापरासह हॉटेल व्यावसायिकांकडून नारळाची मागणी असते. त्यातून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शेतकरी-बागायतदारांच्या हातामध्ये हमखास ‘पै’का मिळवून देणारा नारळ सातत्याने बदलणारे हवामान, असंतुलित पाऊस आणि कीडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे निसर्गाच्या दुष्टचक्रामध्ये अडकला आहे. त्यामुळे उत्पादन घटल्याने मागणी आणि पुरवठा याचा समतोल बिघडल्याने नारळाच्या दराने चाळीशी ओलांडली आहे.
--राजेंद्र बाईत, राजापूर