

Konkan Cyclone
esakal
बांदा: रोणापाल गावाला चक्रीवादळाचा गुरुवारी जबरदस्त फटका बसला. काजू, सागवान आणि इतर बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो झाडे उन्मळून पडली. अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कृषी अधिकारी व बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज नुकसानीची पाहणी केली. रोणापाल परिसरात गुरुवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास अचानक आलेल्या तीव्र वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठा धुमाकूळ घातला. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या वादळामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काजू, सागवान, माड आणि केळीची मिळून १५० हून अधिक झाडे उन्मळून पडली. अनेक वर्षांची