Asim Sarode Ratnagiri speech
esakal
रत्नागिरी : ‘कोकणातील पर्यावरणावर सातत्याने अन्याय होत असून, त्याची अवस्था पीडित व्यक्तीसारखी झाली आहे. विकासाला विरोध करण्याचा प्रश्न नाही. मात्र, जगाने बंदी घातलेले किंवा पर्यावरणाला घातक ठरणारे प्रकल्प कोकणावर लादण्याचा प्रयत्न होत असेल तर तो अन्याय येथील जनतेने सहन न करता त्या विरोधात आवाज उठवावा,’ असे आवाहन ॲड. असिम सरोदे यांनी (Asim Sarode Ratnagiri speech) केले.