

farmers leader raju shetti
sakal
वेंगुर्ले : ‘या देशात उद्योगपतींनी गेल्या पाच वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज बुडविले आहे. या बँकांना रिझर्व्ह बँक भांडवल पुरवते आणि रिझर्व्ह बँकेत सामान्य करदात्यांचा पैसा जमा असतो; मग आज कोकणातील शेतकऱ्यांवर संकट आले आहे, तेव्हा सरकार त्यांच्या पाठीशी का उभे राहत नाही? येथील शेतकऱ्याला सावरण्यासाठी केवळ अडीच हजार कोटींच्या तरतुदीची गरज आहे.