

Koyna Dam
esakal
चिपळूण: कोयना धरणातील पाणीटंचाईने यंदा भीषण रूप धारण केले आहे. नवीन जलवर्षाची सुरुवात होऊन दीड महिना उलटला, तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने केवळ सिंचनाचाच नव्हे तर राज्याच्या जलविद्युत निर्मितीचाही श्वास कोंडला गेला आहे. इतिहासात पहिल्यांदाच धरणातून सिंचनाचे पाणी बंद करून केवळ पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची दुर्दैवी वेळ प्रशासनावर आली आहे, ही धोक्याची घंटा आहे.