रत्नागिरीत काही निर्बंधांसह लॉकडाऊन होणार शिथिल : जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन​

Lockdown in Ratnagiri will be relaxed with some restrictions Assurance of District Collector
Lockdown in Ratnagiri will be relaxed with some restrictions Assurance of District Collector

रत्नागिरी : देशात व राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना जिल्ह्यात सलग दुसर्‍यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्याने सामान्य नागरिकांपासून व्यापारी मंडळी नाराज आहेत. त्यामुळे लोकभावना लक्षात घेऊन लॉकडाऊमध्ये शिथिलता द्यावी, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने केली. त्या वेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यात काही निर्बंध ठेवून शिथिलता देऊ, असे आश्‍वासन दिल्याची माहिती भाजप द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.


रत्नागिरी जिल्ह्यात 1 ते 8 जुलै कडक लॉकडाऊन झाला. मात्र या कालावधीमध्येही कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे आजपासून पुन्हा लॉकडाऊन जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केला. याबाबत चर्चा करण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांसह शहराध्यक्ष सचिन करमकर, सरचिटणीस बाबू सुर्वे आणि भाजयुमो शहराध्यक्ष विकी जैन यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली.त्या वेळी अ‍ॅड. पटवर्धन यांनी जिल्हाधिकार्‍यांना लोकांची भावना सांगितली.

100 दिवस लॉकडाऊन झाल्यानंतर लोकांची मानसिकता जपण्याची गरज आहे. जनता नाराज आहे. व्यापार बंद आहे आणि अनेकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. या सर्व भावना लक्षात घेऊन लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्यावी, असे पटवून देण्यात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पटवर्धन  यशस्वी ठरले. त्यामुळे नक्कीच शिथिलता देऊ, अशी ग्वाही दिली.याशिवाय अ‍ॅड. पटवर्धन यांनी विविध प्रश्‍नांवर जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली. कोरोना लक्षणे न दिसणार्‍यांनाही चाचणीची परवानगी आणि खासगी रुग्णालयांना कोरोना तपासणीसाठी परवानगी द्यावी, या मागणीवर जिल्हाधिकार्‍यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले.

भाजप शिष्टमंडळाला जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन​

राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील कोविड सेंटरमध्ये गैरसोयी आहेत. जेवणासाठी कँटीन नाही. या प्रश्‍नावर स्थानिकांनी अर्ज केल्यास लगेच कँटीनचा ठेका देऊ, असे जिल्हाधिकार्‍यांनी अ‍ॅड. पटवर्धन यांना सांगितले. सर्व बँका सध्या पासबुक छापून देत नाहीत. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व नोकरदारांची गैरसोय होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन सर्व बँकांना तसे आदेश देतो, असे जिल्हाधिकार्‍यांनी आश्‍वासन दिल्याचे अ‍ॅड. पटवर्धन म्हणाले.

साडवली केंद्रही बदलणार

संगमेश्‍वर तालुक्यातील साडवली येथे स्क्रिनिंग केंद्रामध्ये काही अडचणी आहेत. सध्या येथे पावसामुळे नागरिकांना बाहेर भिजत रांगेत उभे राहावे लागते हा प्रश्‍न जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांनी मांडल्यावर हे केंद्र अन्यत्र बदलण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com