आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य आणि योजना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी एक विशेष कार्ड दिले जाते, त्याला गोल्डन कार्ड म्हणतात.
रत्नागिरी : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (Ayushman Bharat Jan Arogya Scheme) आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ४ लाख २६ हजार कुटुंबांतील १६ लाख २८ हजार लाभार्थ्यांपैकी ५ लाख ३६ हजार लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड तयार झाले आहेत.