

leaders protest meeting
sakal
देवगड : आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे चालू शेती कर्ज गोठवण्याबरोबरच हेक्टरी सुमारे पाच लाख रुपये भरपाईसह अन्य मागण्या मान्य न झाल्यास १२ मार्चला ओरोस येथे मोर्चा काढण्यात येईल. त्यातूनही राज्य सरकार जागे न झाल्यास रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या बागायतदारांना सोबत घेऊन मुंबई-गोवा महामार्ग रोखण्याचा इशारा आज जामसंडे येथील आंबा बागायतदार मेळाव्यात देण्यात आला.