Mumbai Goa Highway
Mumbai Goa Highwaysakal

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग काम पूर्णत्वासाठी जानेवारी २०२६ ही नवी डेडलाईन

मुंबईतून सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांना बारा ते पंधरा तासांचा विलंब सहन करावा लागत आहे.
Published on

कणकवली - मुंबई ते गोवा महामार्ग मे २०२५ पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्‍वाही सरकारकडून दिली होती; परंतु चौपदरीकरण कामाची गती धीमी राहिल्‍याने यंदा शिमगोत्‍सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. मुंबईतून सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांना बारा ते पंधरा तासांचा विलंब सहन करावा लागत आहे. आता राज्‍याने जानेवारी २०२६ अशी महामार्ग पूर्णत्‍वाची नवीन तारीख दिली आहे; मात्र कामाची गती पाहता चौपदरीकरण पूर्णत्‍वासाठी आणखी दोन वर्षे जाण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे यंदाच्या गणेशोत्‍सवातही चाकरमान्यांचा महामार्गावरील प्रवास खडतरच राहण्याची शक्‍यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com