

रत्नागिरी : मूल होत नाही म्हणून हिणविण्याच्या रागातून पाच वर्षांच्या चिमुरडीचा पाण्यात बुडवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार कसलये-तिस्क फोंडा (गोवा) येथे हा घडला. खुनानंतर घराच्या बाजूला मृतदेह पुरण्यात आला होता. मृत मुलीचे नाव अमेरा ज्युडान अन्वारी (वय ५) असे असून, ती मूळ रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील असून, कौटुंबिक कारणावरून आईसह ती आणखी एका बहिणीसह आजीकडे गोव्याला राहात होती. गोवा पोलिसांनी संशयित पती-पत्नीला अटक केली आहे. संशयित महिला सांगली जिल्ह्यातील असल्याचे समजते.