

Mango and cashews farmer
sakal
कणकवली : आंबा आणि काजू नुकसानभरपाईच्या मागणीसाठी आज पुन्हा बागायतदार आक्रमक झाले. त्यांनी नांदगाव येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखला. भरपाईची घोषणा दोन दिवसांत होईल, अशी जिल्हाधिकाऱ्यांकडून लेखी ग्वाही मिळाल्यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी बागायतदार शेतकऱ्यांतर्फे सुरू केलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित केले. नुकसानभरपाई देण्याबाबत फसवणूक झाली तर संघर्ष अटळ असून, थेट ‘वर्षा’ बंगल्यावर आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला.