

Promises Change, Problems Don’t: The Story of Unfinished Struggles
esakal
-राजेंद्र बाईत, राजापूर
रोजगार, गुंतवणूक अन् त्यातून होणारा विकास डोळ्यासमोर ठेवून राजापूर तालुक्यात गेल्या दोन-अडीच वर्षामध्ये औद्योगिक आणि ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्याची शासनातर्फे घोषणा करण्यात आली आहे. पर्यावरण, जैवविविधतता यासह लोकजीवन धोक्यात येण्याच्या मुद्यांनुसार या प्रकल्पांना स्थानिक पातळीवर सातत्याने विरोध झाला. दोन-अडीच वर्षानंतरही एकही प्रकल्प प्रत्यक्षात आलेले नाहीत. अशातच, बारसू अणुऊर्जा प्रकल्प या नव्या प्रकल्पाची घोषणा झाली असून, त्याच्या विरोधातही वातावरण तापू लागले आहे. प्रस्तावित प्रकल्प प्रदूषणकारी आहेत की, पर्यावरणपूरक याचे शासकीय आणि जनसामान्यांचे मापदंड वेगवेगळे असले तरी, एकंदरीत राजापूर तालुक्यातील प्रस्तावित औद्योगिक आणि ऊर्जाप्रकल्पांची वाटचाल मागील पानावरून पुढे अशीच काहीशी सुरू झाली आहे.