रत्नागिरी : मराठ्यांच्या आरक्षणाचा राज्य सरकारने विचका केला आहे. चांगला वकील देता आला नाही. यावरूनच सरकार किती गंभीर आहे, हे दिसते. मराठा समाजावर आंदोलन करायची वेळ आणू नका, असा इशारा भाजप नेते नीलेश राणे यांनी दिला.
रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारने नेमलेला वकिल न्यायालयात उपस्थित राहत नाही. तारखांवर तारखा पडत राहिल्या तर मराठा समाजातील तरुणांची अवस्था बिकट होईल. तसे झाले तर सरकारचे काहीच खर नाही. मराठा समाजाच्या आंदोलनाचे नियोजन कसे असते. मागील वेळी सर्वांनीच पाहिले आहे.
मराठा रस्त्यावर उतरले तर सरकारला पळायला लावेल. लवकरच निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करायला भाग पाडू नका, असा इशारा त्यांनी दिला. तिवरे धरण फुटीला जबाबदार असलेल्यांवर अद्यापही कारवाई झालेली नाही. यासंदर्भात न्यायालयात जायची आमची तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
अहवाल आल्यानंतर पाहू
कोल्हापूरमधून आलेल्या त्या सलाईन साठ्याच्या विषयावर आमचं लक्ष आहे. सध्या चौकशी सुरु असून त्याचा अहवाल काय येतो, हे आम्ही पाहत आहोत. त्यानंतर तो विषय हाताळू. रत्नागिरीत विविध विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. प्रत्येक दिवशी एक प्रकरण बाहेर येईल, अशी स्थिती असल्याचे नीलेश राणे यांनी सांगितले.
महिन्यानंतर चित्र स्पष्ट
नाणार रिफायनरीसाठीच्या जागांची चौकशी होणार आहे. एक महिन्याच्या आत त्याचा अहवाल विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मागितला आहे. अजून वीस दिवस शिल्लक आहेत. सध्या चौकशी सुरू आहे की, नाही याबाबत मी जास्त विचार करत नाही. महिना पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल. या चौकशीत अनेक शिवसैनिकच सापडणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.