

Agriculture Subsidy
sakal
वैभववाडी : वातावरणातील बदलाचा फटका बसलेल्या कोकणातील आंबा व काजू बागायतदारांसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात भरपाईची घोषणा केली. फळपीक विमा संरक्षित नसणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपये जाहीर केले. दरम्यान, विमा संरक्षित केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४२ हजार रुपये मिळतील. या भरपाईवरून कोकणातील शेतकऱ्यांची धुसफूस सुरू झाली आहे.