चपलेने मारण्याचे फर्मान, समर्थक कोण ? : आंबेरकर

pandharinath amberkar criticised on nanar project to vinayak raut in ratnagiri
pandharinath amberkar criticised on nanar project to vinayak raut in ratnagiri
Updated on

राजापूर : नाणार प्रकल्प प्रस्तावित असलेल्या भागातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व असून सरपंचही शिवसेनेचे आहेत. मात्र, प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांना चपलेने मारण्याचे फर्मान खासदार यांनी काढले आहे. असे असताना शिवसेनेचे सरपंच वा ग्रामपंचायती प्रकल्प समर्थनाचे ठराव देतील कसे, असा सवाल करत कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी वर्मावर बोट ठेवले.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रिफायनरीच्या मागणीचे वा समर्थनाचे त्या परिसरातील कोणत्याही ग्रामपंचायतीचे ठराव नसल्याच्या गोष्टींकडे खासदारांनी लक्ष वेधले होते. त्यावर आंबेरकर यांनी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ ज्या ग्रामपंचायतींचे ठराव खासदार विनायक राऊत यांना अपेक्षित आहेत, त्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व आणि सरपंच शिवसेनेचे आहेत.

प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांना चप्पलेने मारा, असे आदेश काढणारे खासदार जर आता ग्रामपंचायतींचे ठराव का येत नाही, असा प्रश्‍न उपस्थित करीत असतील तर, सेनेची सत्ता असणाऱ्या ग्रामपंचायतींचे प्रकल्प समर्थनार्थ ठराव न येण्यामागचे झारीतील शुक्राचार्य कोण, हे सर्वश्रुत आहे, असा टोला लगावला. आंबेरकर म्हणाले, प्रत्येक वेळी विरोध करताना खासदार राऊत यांनी कारणे बदललेली आहेत. आधी प्रदूषण, मग जमिनींचे गैरव्यवहार व आता ग्रामपंचायतींचे ठराव अशी विविध कारणे त्यांच्याकडून सांगितली जात आहेत. प्रत्येकवेळी कारणे बदललेली असली तरी, विचार मात्र तोच आहे.

प्रकल्प तडीस नेण्यास कटिबद्ध

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ रिफायनरी प्रकल्प विरोधकांना सोबत घेऊन शिवसेनेची वाटचाल करण्याची राऊत यांची भविष्यातील योजना आहे. मात्र, रोजगार, प्रगत शिक्षण, वैद्यकीय आणि मूलभूत सुविधा हे प्रश्‍न घेऊन दोन्ही जिल्ह्यातील जनता प्रकल्प राजापुरातच तडीस नेण्यास कटिबद्ध असल्याचा दावाही आंबेरकर यांनी केला.

तंबी नेमकी कोणी दिली ?

राजापूर तालुका शिवसेना कार्यकारिणीमध्ये रिफायनरी प्रकल्प समर्थनाचा ठराव करण्याच्या काही महिन्यांपूर्वी हालचाली सुरू होत्या. अशा हालचाली वा प्रयत्न करणाऱ्यांना आपापल्या पदांचे राजीनामे देण्याची तंबी नेमकी कोणी दिली होती, असा सवाल कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी केला.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com