खेड : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्यातील महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चार महिन्यांच्या आत प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्याच्या राजकारणाला नवसंजीवनी मिळाली. एकीकडे राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला असतानाच, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी कोकण दौऱ्यात स्पष्ट भूमिका घेत युती-आघाड्यांतील अस्थिरतेकडे लक्ष वेधले.