
राजापूर (रत्नागिरी) : तालुक्यातील पडवे येथील नवोदय विद्यालयामध्ये सहावीच्या वर्गासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे रहिवाशी प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. असे असताना तालुक्यातील जानशी येथील प्रशाळेमध्ये परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अशाप्रकारे पाचवीच्या वर्गात प्रवेश दिला जात असल्याची तक्रार या शाळेच्या शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्षा साक्षी जैतापकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
गुणवत्ता ठासून भरलेली असतानाही नवोदय विद्यालयामध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना फारशी संधी मिळत नसल्याची तक्रार स्थानिक पालकांमधून गेल्या काही वर्षापासून केली जात आहे. त्यावर अनेक बैठकांमध्ये चर्चेची गुर्हाळही यापूर्वी रंगली आहेत. मात्र, तरीही त्या चित्रामध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही. अशा स्थितीमध्ये नवोदय विद्यालयामध्ये सहावीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडालेली असताना त्या अनुषंगाने तालुक्यातील जानशी येथील साने गुरूजी विद्यामंदीर प्रशाळेच्या शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्षा जैतापकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे.
जानशी येथील प्रशालेमध्ये गेल्या काही वर्षामध्ये नवोदय विद्यालय, पडवे (ता. राजापूर) मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी परजिल्ह्यातील मुलांना पाचवीच्या वर्गात प्रवेश दिला गेल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे. संबंधित मुले त्या शाळेमध्ये उपस्थित राहत नसल्याचेही त्यामध्ये नमूद करताना या सार्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर आता या प्रकरणातून नेमके काय निष्पन्न होणार ? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.