

Government Workers in Maharashtra Go on Strike, Services Likely to Be Hit
esakal
-अमित गवळे
पाली: राज्यातील सरकारी, निमसरकारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. गेल्या १५ महिन्यांपासून मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष आणि शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवार (ता. 21) पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या संपात रायगड जिल्ह्यातील सर्व कर्मचारी आणि शिक्षक पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याची माहिती समन्वय समितीने दिली आहे.