

पाली, उन्हाच्या चटक्यापासून बचावासाठी झाडाच्या सावलीत विसावलेली जनावरे. (छायाचित्र: अमित गवळे)
Sakal
पाली : राज्यात विशेषतः कोकण किनारपट्टीला आणि रायगड मध्ये पारा वाढू लागल्याने माणसांप्रमाणेच पशुपक्षी आणि जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे पशुधनाची वाताहत होऊ नये, यासाठी रायगड जिल्हा पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली असून पशुपालकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना आणि उपाययोजना जारी केल्या आहेत. "पशुपालकांनी आपल्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी," असे आवाहन रायगड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे यांनी केले आहे.