सरकारचा त्या तीन कोटी रुपयांच्या व्याजावरती डोळा...

rajan teli press conference in sindhudurg
rajan teli press conference in sindhudurg
Updated on

कणकवली (सिंधुदुर्ग)  : केंद्र शासनाने थेट ग्रामपंचायतींसाठी 13 व्या आणि 14 व्या वित्त आयोगातून जमा केलेल्या पैशाच्या तब्बल तीन कोटी रुपये व्याजावर राज्यशासनाने डोळा ठेवला असून हे व्याज परत मागविले आहे. हा पैसा सरकारने स्वतःकडे वळवला तर भाजप जन आंदोलन छेडेल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजन तेली यांनी आज पत्रकार परिषदेतून दिला आहे


 येथील पंचायत समिती मध्ये सभापती यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री तेली म्हणाले केंद्र शासनाने थेट ग्रामपंचायतीने निधी देण्यासाठी तेराव्या आणि 14वित्त पैसे पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना वर्ग केले होते सिंधुदुर्गात पंचायत समितीच्या मध्ये यातील जी रक्कम जमा झाली त्याचे व्याज साधारण तीन कोटी रुपये आहे हे राज्य सरकारला अदा करावे असा आदेश राज्याच्या ग्रामविकास खात्याने काढला आहे इतकेच नव्हे तर यातील जो निधी अखर्चित आहे. त्याची ही माहिती मागविण्यात आली आहे.  केंद्र शासनाच्या निधीवर राज्य सरकारने डोळा ठेवला आणि हा पैसा मागे गेला तर आम्ही जन आंदोलन छेडू यासाठी जिल्ह्यातील सगळ्या सरपंचांचा सहभाग घेतला जाईल मुळात कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी संस्था  विलीनीकरण म्हणून ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगातून काही निधी खर्च केला.

मात्र सरपंचांना थेट सरकार करून एकही रुपया मिळालेला नाही आणि असलेल्या पैशावर डल्ला मारण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे असेही ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक आराखडा 225 कोटीचा होता प्रत्यक्षात मात्र 147 कोटीच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली यातून 33 टक्के रक्कम चालू वर्षी प्राप्त झाली आहे.  या 46 कोटी निधीतून आरोग्य विभागासाठी अकरा कोटी 79 लाख देण्यात येणार आहेत मग जिल्ह्याच्या विकासासाठी किती पैसा शिल्लक आहे. हे सत्ताधारी पालकमंत्री खासदार आमदारांनी जनतेला सांगावे असे आवाहनही तेली यांनी केले आहे गेल्या तीन महिन्यातील अडचणीमुळे ग्रामपंचायतीचा निधी खर्च होऊ शकला नाही त्यामुळे 31 मार्चला शिल्लक असलेल्या निधी परत घेण्याबाबतही सरकारने आदेश काढला आहे.

याबाबतही लोकांमध्ये नाराजी आहे कोरोनाचा प्रादुर्भाव एकीकडे वाढत असून जिल्ह्यात तपासणी लँब होण्याबाबत राजकारण सुरू आहे पालकमंत्र्यांनी रत्नागिरीतला मंजुरी दिली पण सिंधुदुर्गाचे काय असा सवालही तेली यांनी पुन्हा उपस्थित केला आहे मागील सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेली नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप जमा होऊ शकलेले नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केला या पत्रकार परिषदेला कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर,  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत , भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मधुसूदन बांदिवडेकर आदी उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com