राजापूर : ओझर धरणासाठी ३५.४९ कोटी

२५५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली; उर्वरित रखडलेल्या कालव्यांची कामे मार्गी लागणार
धरणाच्या पाणीसाठ्याचा खऱ्या अर्थाने शेतीसह सिंचनासाठी उपयोग होणार आहे.
धरणाच्या पाणीसाठ्याचा खऱ्या अर्थाने शेतीसह सिंचनासाठी उपयोग होणार आहे.sakal

राजापूर : तालुक्यातील तीन गावांमधील सुमारे २५५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणाऱ्या ओझर धरणाच्या उर्वरित कामासाठी २०१७-१८ च्या दरसूचीवर आधारित ३५.४९ कोटी रुपयांच्या निधीला शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या धरणाचे सद्यःस्थितीमध्ये बांधकाम पूर्ण झाले असून, कालव्यांचे काम रखडलेले आहे. या निधीतून रखडलेल्या या कालव्यांचे काम आता मार्गी लागणार असून, त्या द्वारे या धरणाच्या पाणीसाठ्याचा खऱ्या अर्थाने शेतीसह सिंचनासाठी उपयोग होणार आहे.

तालुक्यातील ओझर येथे ओझर लघु पाटबंधारे योजने अंतर्गत माती धरण बांधले आहे. धरणाचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्यामध्ये सुमारे ५.४६ दलघमी पाण्याचा साठाही झालेला आहे. मात्र, सिंचनाखाली येणाऱ्या तीन गावांमध्ये धरणातील पाणीसाठा पोहचवणार्‍या कालव्यांचे काम अद्यापही रखडलेले आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता होती. या धरणाच्या कामासाठी यापूर्वी २०००-०१ च्या दरानुसार सुमारे ८.७० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यानंतर आता सन २०१७-१८ च्या दरसूचीवर आधारित ३५.४९ कोटी रुपयांच्या निधीला सुधारित प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. हा निधी मंजूर करताना धरणाच्या बांधकामाची सद्य:स्थिती, दरसूचीतील बदल, नवीन भूसंपादन कायदा, भूसंपादन खर्चात झालेली वाढ, संकल्पचित्रातील फेरबदल, गौणखनिज शुल्काच्या दरात झालेली सुधारणा इत्यादी किंमतवाढीचा विचार करण्यात आलेला आहे.

धबधबा या धरणापासून जवळ

या धरणाच्या नाल्यातून वाहणारे पाणी पुढे अर्जुना नदीला जाऊन मिळते. त्या दरम्यान, उंचावरून कोसळणारा ''ओझरकडा धबधबा'' हौशी पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरलेला आहे. हा धबधबा या धरणापासून जवळ असून, या धबधब्याखाली आंघोळ, मौजमस्ती करण्यासाठी पावसाळ्यामध्ये मोठ्या संख्येने हौशी पर्यटक जातात.

दृष्टिक्षेपात

  • धरणाचे बांधकाम पूर्ण, मातीचे धरण

  • धरणामध्ये ५.४६ दलघमी पाणीसाठा

  • ओझर, साबळेवाडी आणि तिवरेला फायदा

  • सुमारे २५५ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

ओझर धरणाचे काम पूर्ण झाले असून, कालव्याचे काम प्रलंबित आहे. ३५.४७ कोटीच्या निधीला सुधारित प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून त्याच्यातून कालव्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षामध्ये कालव्यांचे काम पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. या कालव्यांच्या माध्यमातून ओझर, साबळेवाडी आणि तिवरे गावांमधील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार आहे.

- दीपक जोशी, उपकार्यकारी अभियंता, चिपळूण पाटबंधारे विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com