राजापूर : नव्याने मोहोर तरी शेतकरी चिंतातूर

राजापूर तालुक्यातील चित्र; मे महिन्यामध्ये आंबा तयार होणार, कॅनिंगसाठी पाठवणे शक्य
नव्याने मोहोर तरी शेतकरी चिंतातूर
नव्याने मोहोर तरी शेतकरी चिंतातूरsakal
Updated on

राजापूर: अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि त्यानंतर हवामानामध्ये सातत्याने प्रतिकूल झालेले बदल यामुळे अनेक आंबा बागांमध्ये फळधारणा झालेली नाही. काही झाडांवरील मोहोर काळा पडला तर, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामध्ये अनेक बागांमध्ये कैरी गळून नुकसान झाले. त्यामुळे आंबा बागायतदार आणि शेतकरी चिंताग्रस्त असताना नव्याने आंब्याला मोहोर येऊ लागल्याने त्यांच्या चेहऱ्‍यावर प्रश्नचिन्ह दिसत आहे.

सध्या मोहोरलेल्या झाडांना हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये आंबा तयार होणार आहे. त्या आंब्या पेट्या मार्केटमध्ये पाठवून समाधानकारक भाव मिळणे मुश्कील असले तरी, कॅनिंगसाठी पाठवणे शक्य होणार आहे. त्यामुळे खते, औषध फवारणी आदींसाठी केलेला किमान खर्च त्यातून भागण्याची शक्यता आहे.

यावर्षी मोहोर येण्याच्या कालावधीमध्ये असलेल्या प्रतिकूल हवामानाने आंबा हंगामाला चांगलाच तडाखा बसला. त्यातून, आंबा झाडांना अपेक्षित असलेला मोहोर आलेला नाही. थंडीचे कमी प्रमाण, ढगाळ वातावरण अशा स्थितीतही काही झाडांना मोहोर आला. मात्र, प्रतिकूल परिणाम होऊन तोही काळा पडून गळून गेला आहे. याच्यातून यावर्षी आंब्याचा हंगाम गतवर्षीच्या तुलनेमध्ये घटल्याचे चित्र दिसत आहे. त्याच्यातून खतासाठी केलेला खर्च, विविध औषध फवारणी आणि देखभाल यासाठी केलेला खर्च भागेल, एवढे उत्पन्न मिळेल की नाही, याबाबत शेतकरी साशंक दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.