'नाणार रिफायनरी होणार नाही; शिवसेना स्थानिकांसोबत कायम'

स्थानिक जनते सोबत शिवसेना कायम आहे
'नाणार रिफायनरी होणार नाही; शिवसेना स्थानिकांसोबत कायम'

राजापूर (रत्नागिरी) : राजापूर (Rajapur) शहरासह तालुक्याचा सर्वांगीण विकास, दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा, शैक्षणिक विकास अन् रोजगार निर्मितीसाठी प्रस्तावित रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची (nanar refinery project) आवश्यकता असून प्रकल्प उभारणीचे समर्थन करणारा ठराव काल (मंगळवार) नगर पालिकेच्या सभेमध्ये संमत करण्यात आला. नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पालिकेच्या बैठकीमध्ये अकरा विरूद्ध पाच मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला. यामध्ये सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी (congress- NCP) आघाडीसह भाजपचे एक तर, विरोधी गट असलेल्या शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी प्रकल्प समर्थनाची भूमिका घेतली आहे. यावरुन रत्नागिरीचे पालकमंत्री उदय (uday samant) सामंत यांनी ट्वीट करुन यासंबधित प्रतिक्रीया दिली आहे. ट्वीट मधून त्यांनी राजापूर नगरपालिकेवर टीका केली आहे.

ते म्हणतात, नाणार रिफायनरी संदर्भात ठराव घालून राजापूर नगरपालिकेने स्थानिकांच्या भावना दुखावल्या आहेत. स्थानिक जनते सोबत शिवसेना कायम आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार येथे रिफायनरी होणार नाही हे निश्चित आहे. कुणी राजकारण करत असेल तर तेथील जनता माफ करणार नाही. अशा शब्दांत त्यांनी विरोधकांची कानउघाडणी केली.

दरम्यान, रिफायनरी प्रकल्प होणे गरजेचे असून ग्रामपंचायतींनीही ठराव दिले असून नगर परिषदेने ठराव द्यावयास काहीच हरकत नाही. आपण प्रारंभीपासूनच या प्रकल्पाच्या समर्थनाच्या बाजूने आहोत, अशी प्रतिक्रीया शिवसेना नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com