सावधान: रस्त्यात दिसताच कोरोना टेस्ट; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

मारुती मंदिर जवळ आडवुन तपासणी : ६० जणांची झाली चाचणी
curfew
curfew

रत्नागिरी : जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. केवळ मेडिकल इमर्जन्सीसाठीच लोकांना घराबाहेर पडता येणार आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची गाडी जप्त केली जाणार आहे. तसेच त्याच ठिकाणी त्यांची कोरोना चाचणी करून पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास त्यांना क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

जिल्ह्यात आजपासून संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू आहे.तसेच विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर कडक फाईन बसवण्यात येणार आहे. किराणा खरेदीसाठी होम डिलिव्हरीचा पर्याय निवडावा आणि जवळच्याच दुकानातून किराणा खरेदी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. प्रत्येकाच्या राशनची जबाबदारी शासनाने घेतली आहे. केवळ मेडिकल इमर्जन्सीसाठीच घराबाहेर पडा असे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे. तरी नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यांना मारुती मंदिर येथे आडवुन तपासणी केली जात आहे. यामध्ये पर जिल्ह्यातून आलेल्या वाहन धारकांचा समावेश आहे. यांची वाहने ताब्यात घेऊन लगेच कोरोणा चाचणी केली जात आहे. आतापर्यंत ६० जणांची चाचणी झाली आहे..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com