

The district administration has appealed to residents to stay alert and avoid unnecessary travel as flood conditions continue.
Sakal
पाली : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सोमवारी (ता. 6) सायंकाळी ५ वाजेपर्यंत आलेल्या शासकीय अहवालानुसार, सावित्री, अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत होत्या. तर उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली. केवळ पनवेलमधील गाढी नदी इशारा पातळीच्या खाली वाहत होती.