

Heavy Damag
sakal
वैभववाडी : जिल्ह्याच्या बहुतांश भागाला आज सायंकाळी अवकाळीचा तडाखा बसला. शिराळेत वादळाने दाणादाण उडाली. यात काही घरांची पडझड झाली आहे. वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, काजू पिकांचे नुकसान अटळ आहे. जिल्ह्याला गुरुवारी (ता. २६) सायंकाळी अवकाळीचा तडाखा बसला. कणकवली, वैभववाडी आणि देवगड तालुक्यांतील काही गावांमध्ये गारपीट, वादळीवारा, विजांच्या गडगडाटांसह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वैभववाडीतील गावात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली.