रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला अत्यावश्यक असेल तरच कोकणात या, असं आवाहन शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चाकरमान्यांना केलं आहे.
मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यानी अत्यावश्यक असेल तरच गणेशोत्सवाला कोकणात आपल्या गावी यावं, असंही खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळेच चाकरमान्यांसाठी एसटी बस सेवा सुरु करण्यास उशीर होत असल्याचही खासदार राऊत यावेळी म्हणाले.
बाहेरच्या जिल्ह्यातून कोकणात येणाऱ्याना चौदा दिवसांचा क्वारंटाईन पाळावाच लागेल, असंही खासदार राऊत यांनी स्पष्ट केलं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भावनेच्या भरात चाकरमान्यांबाबत निर्णय घेणे, योग्य ठरणार नसल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच कोकणात येणाऱ्यांपैकी कोरोना संशयितांची रॅपिड टेस्टही केली जाणार आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या 1746 आहे. त्यापैकी 1133 बरे झाले असून आजपर्यंत 59 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 380 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 263 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आजपर्यंत मृत्यू 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
संपादन - अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.