

Sindhudurg
esakal
आरोंदा: तिरोडा-नाणोस जोडणाऱ्या नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला काही दिवसांतच तडे गेल्याचे निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जागृत ग्रामस्थांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुलाला तडे गेल्याने वाहनधारक व नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने पुलाच्या दोन्ही बाजूंना सावधानतेचा इशारा देणारे फलक लावण्यात आले आहेत.