

Snakebite Notifiable Disease
esakal
रत्नागिरी: जिल्ह्यात पावसाळा असो वा शेतीची कामे, साप किंवा विंचूदंशाच्या घटना नेहमीच चिंतेचा विषय ठरतात. त्यातही विषारी सर्पदंशामुळे अनेकदा नागरिकांना जीव गमवावा लागतो किंवा काहींना कायमचे अपंगत्व येते. ही बाब लक्षात घेऊन राज्यशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत सर्पदंशाचा समावेश थेट अधिसूचित आजारांमध्ये केला आहे. कोकण आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत दिलासादायक मानला जात आहे.