वाडा - वाडा अघई महामार्गावरील जांभुळपाडा येथे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस शेतात जाऊन झालेल्या अपघातात 52 प्रवाशी जखमी झाले आहेत. यामध्ये दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले असून उर्वरितांवर वाडा येथील ग्रामीण व खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रवाशात बहुसंख्य विद्यार्थी आहेत.
मनवमी प्रसाद (50) सुमन प्रसाद (45) यांच्या हातापायाला फॅक्चर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,वाडा आगाराची वाडा- पिवळी एम एच 14 बीटी 2331या क्रमांकाची आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बस पिवळीहून वाड्याकडे येत असताना होती. बसचा चालक अतिवेगाने गाडी चालवत होता.जांभुळपाडा येथे असलेल्या गतिरोधकावर चालक काशिनाथ जाधव याने जोराचा ब्रेक लावल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटून बस थेट शेतात गेली. या अपघातात 52 प्रवाशांना दुखापती झाल्या असून त्यापैकी दोघांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना ठाणे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.तर उर्वरितांवर वाडा येथील ग्रामीण व खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.