
राजापूर _ विरोधामुळे गेल्या काही वर्षांमध्ये वादग्रस्त ठरलेल्या आणि सुमारे एक कोटीपेक्षा अधिक खर्च करून नगरपालिकेने शहरानजीकच्या हर्डी येथे उभारलेल्या घनकचरा प्रकल्पाला मंगळवारी (ता. 5) सायंकाळी आग लागली होती. प्रकल्पाला आग लागण्याची ही तिसरी वेळ आहे.
अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात पालिकेला यश आले. नेमकी आग लागली कशी हा प्रश्न अनुत्तरित आहे. प्रकल्पाला यापूर्वी दोनवेळा आग लागण्याचे प्रकार घडले होते. त्यावेळी पालिकेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करून पालिकेला संशयितांची नावे देण्यास सांगितले होते. मात्र त्याला पालिकेने असमर्थता दाखविली होती. त्यामुळे याबाबत कोणतीच कारवाई झाली होती.
त्यानंतर मंगळवारी सायंकाळी घनकचरा प्रकल्पाला तिसऱ्यांदा आग लागली. प्रकल्पातील एका शेडमधील कचऱ्याला आग लागली. याबाबत माहिती मिळताच पालिकेचा बंद घटनास्थळी दाखल झाला. त्याने आग आटोक्यात आणली. नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Ratnagiri
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.